महापरिनिर्वाण दिनी डॉ.आंबेडकरांना घरुनच अभिवादन करा - राज्यमंत्री संजय बनसोडे


नवी मुंबई - महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. दरवर्षी सातत्याने भीमानुयायांचा जनसागर भारताच्या कानाकोपऱ्यातून या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतो. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे यावर्षी भिमानुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून आपल्या आचरणाने आणि कृतीतून घरातूनच अभिवादन करावे, हीच खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.

              बनसोडे म्हणाले की, येणारा ६ डिसेंबर हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. समाजाप्रती त्यांचे कार्य आणि समर्पणाला वंदन करण्यासाठी देशभरातून भिमानुयायी आस्थेने येत असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न देखील आहेत.ते आम्हा साऱ्यांचे आदर्श असून आम्हीही त्यांचे अनुयायी आहोत. समाजात समानता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आजीवन संघर्ष केला. अन्याया विरुद्ध बंड पुकारले. त्याचबरोबर भारताचे संविधान निर्माण करून देशाला कायदे, अटी, नियम, आचारसंहिता घालून दिल्या. असे असताना ज्या महामानवाने संविधान निर्माण केले त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात जनतेचा जीव धोक्यात घालणे अनुचित ठरेल. म्हणूनच, ही वेळ आहे आपल्या आचरणातून एक सुजाण नागरिक असल्याची प्रगल्भता दाखविण्याची. आजही कोविडचा धोका आहे, तो नष्ट झाला असे मानणे चूक आहे. चैत्यभुमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमतरता येऊ दिली जाणार नाही. यापुर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा,असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

Popular posts
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image