दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.

दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु 

नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.  


नवी मुंबई :- नेरुळ विभाग कार्यालय हद्दीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सारसोळे गाव,मिर्झा अपार्टमेंट प्लॉट नंबर ४१४ च्या बाजूला असलेल्या अनधिकृत इमारतीवर काही दिवसांपूर्वी सिडकोकडून तोडकं कारवाई करण्यात आली होती.तर त्यापूर्वी एकदा नेरुळ विभाग कार्यालयाकडून ही तोडकं कारवाई करण्यात आली होती.या कारवायांना काही दिवस उलटत नाही तोच बांधकाम धारकाने पुन्हा बांधकाम सुरु केले आहे.इमारतीचा जो भाग तोडण्यात आला होता,त्या भागाला डागडुजी करून बांधकाम धारकाने पुन्हा बांधकाम सुरु केले आहे.सदरील बाब नेरुळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणूनही विभाग कार्यालय शांत असलयाने अखेर कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मनपा अधिकाऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे आजतायागत शेकडो कुटुंब बेघर झाले असून अजून किती जणांचा जाणार हे सांगता येत नाही.सिडको व महापालिका अतिक्रमण विभाग हे नेहमी अर्धवट कारवाया करत असल्याने त्यातून त्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासले जातात की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती सध्या स्थितीत निर्माण झाली आहे.

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image