वीज चोरांविरूद्ध महावितरणाची धडक मोहीम, ४०१ वीजचोरांवर कारवाई

नवी मुंबई :- महावितरणच्या कल्याण परिमंडळात ७ ते ९ आक्टोबर या सलग तीन दिवसात वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम राबवून ४ हजार ६५९ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली.यात ४०१ ठिकाणी विविध हातखंडे वापरून वीजचोरी होत असल्याचे आणि ११८ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळला.संबंधितांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.याशिवाय २२० ठिकाणी वीज वापराची अचूक नोंद मीटरमध्ये होत नसल्याचे आढळून आले.या मोहीमेत ८३ संशयित वीजमीटर बदलण्यात आले. 

                  कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली २०० महिला कर्मचारी,२१४ सुरक्षारक्षक यांच्यासह ९७८ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २२५ विशेष पथकांकडून ही धडक मोहीम राबवण्यात आली.तर या मोहीमेसाठी ३२ पोलिस कर्मचाऱ्यांची मदतही घेण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या एकूण वीज जोडण्यांपैकी ८.६ टक्के जोडण्यांमध्ये मीटरशी छेडछाड अथवा थेट मीटर बायपास करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित ४०१ ग्राहकांवर वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई सुरू आहे. तर अनधिकृत वीजवापर आढळलेल्या ११८ जणांवर कलम १२६ अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिम विभागातील सोनारपाडा, नांदिवली, काळेगाव, सांडप, काटेमानवली, कटाई, पारनाका, अन्सारी चौक, गोविंदवाडा, शिवाजी चौक भागात ५० पथकांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईत ९४ ठिकाणी १ लाख ७४ हजार युनिटची वीजचोरी व १९ ठिकाणी १० हजार ४०० युनिट विजेचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला.कल्याण ग्रामीण आणि उल्हासनगर एक व दोन विभागातील टिटवाळा, शहापूर, व्हिनस चौक,३० सेक्शन, गायकवाड पाडा, तानाजी नगर, वूलन चाळ, खुंटवली आदी भागात ९२ पथकांनी केलेल्या कारवाईत १२३ ठिकाणी वीजचोरी व ११ ठिकाणी अनधिकृत वीजवापर आढळून आला.वसई आणि विरार विभागात विठ्ठल मंदिर, पेल्हार, नवजीवन, एव्हरशाइन नगरी, सहकारनगर, मानवेलपाडा आदी भागात ५८ पथकांनी ८७ ठिकाणी १ लाख ३७ हजार युनिट वीजेची चोरी (सुमारे १९ लाख रुपये) व ५७ हजार ६०० युनिट विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला. पालघर विभागातील मनोर व विक्रमगड भागात २५ पथकांनी वीजचोरीच्या ९७ व अनधिकृत वीज वापराच्या ३५ जोडण्यांवर कारवाई केली.

मोहीम होणार अधिक तीव्र

वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. कल्याण परिमंडलात वीज चोरीविरुद्धच्या मोहिमेत सातत्य ठेवण्यात येणार असून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे. 


Popular posts
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image