अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा

नवी मुंबई :- ज्या अनधिकृत इमारतींवर काही दिवसांपूर्वी नेरुळ विभाग कार्यालयच्या माध्यमातून तोडकं कारवाया करण्यात आल्या होत्या त्या इमारतींचे काम पुन्हा जोमाने सुरु आहे.या सर्व कामांची माहिती नेरुळ विभाग कार्यालयाला असली तरी आजमतीस विभाग कार्यालय मूग गिळून गप्प बसलं आहे.व फक्त काम किती लवकरात लवकर होईल व त्यात नागरिक कधी राहायला येतील याचा विभाग कार्यालयात बसून आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत शेकडो जण बेघर झाले आहेत.तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.मात्र याचे कोणतेही सोयरसुतक अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत असल्याने अपना काम बनता,भाडं मे जाये जनता या म्हणीप्रमाणे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे.जो देगा उसका भला, जो नही देगा उसके उपर बुलडोजर चला या प्रमाणे कामे होत असल्याचे दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी शिरवणे गावातही जी + २ इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली होती,ती कारवाई सुद्धा दिखाऊ असल्याची दिसून येत आहे.थातुर मातुर कारवाई करायची नंतर मग डीलिंगला बसायचे अशी प्रथा पडतांना दिसून येत आहे.याचे गंभीर परिणाम ग्राहकांना भोगावे लागत असल्याने अजून किती घर उध्वस्त होणार आणि किती नागरिक बेघर होणार हे वेळच ठरवणार आहे.तो पर्यंत भ्रष्टाचारी अधिकारी आपले पोट भरून निघून गेले असतील मन नंतर फक्त आरोप प्रत्यारोप होतील.


Popular posts
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image