नेरुळ येथे मनुष्य मिलन साधना शिबिराची सांगता

नेरुळ येथे मनुष्य मिलन साधना शिबिराची सांगता.... 


"   योग्य आहार , योग्य व्यायाम व योग्य ध्यान " या सूत्राच्या माध्यमातून प्रत्येक मानवाचे शरीर व मन सुदृढ होते याची प्रचिती प्रयोगाच्या माध्यमातून -अनुभवातून देणाऱ्या 'मनुष्य मिलन साधना शिबिराचे ' आयोजन २२ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत नेरुळ येथील रामलीला मैदानात आयोजीत केले होते . या शिबिराचा लाभ जवळपास ३ हजार नागरीकांनी घेतला . सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६. ३० ते ८.३० या दोन सत्रात  परमपूज्य श्री . परम आलय जी यांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून या शिबिराचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला योग्य आहार , योग्य व्यायाम व योग्य ध्यान या गोष्टींचे महत्व प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिले . मानवाची ८० टक्के शक्ती हि डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडत असते म्हणून प्रत्येकाने आपले  मन निरोगी राहण्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे , आपल्या घराच्या स्वयंपाक घरात असणाऱ्या वस्तू मधूनच शरीरास आवश्यक व पोषक असे भोजन बनवले जाऊ शकते ,प्रत्येक मनुष्याच्या शरीरात अथांग शक्ती असते ती योग्य आहार व व्यायामातुन वृद्धिगत करता येते या सर्व सूत्रांचा अनुभव अनेकांना आल्याचा अनुभव या शिबिरात भाग घेतलेल्या नागरीकांनी सांगितले . 


   अगदी १०/१२ वर्षाच्या मुलापासून ते ७५-८० वयापर्यतच्या जेष्ठ नागरीकांनी या १० दिवशीय शिबिराचा लाभ घेतला . विशेष म्हणजे हे संपूर्ण शिबीर हे निशुल्क होते व त्याच बरोबर सर्व शिबिरार्थींना सकाळी आयुर्वदानुसार अतिशय पौष्टिक असा नाष्टा व सायंकाळी विविध प्रकारचे ७ लिक्विड्स दिले जात होते . मानवाची सूर्यनाडी व चंद्रनाडी जागृत करणारे वेगवेगळे व्यायाम शिकवले गेले . एकुणातच आपण आजूबाजूची परिस्थिती बदलू शकत नसलो तरी आपण आपला दृष्टिकॊन सकारात्मक ठेऊन आपले जीवन अधिकाधिक आनंदी व समाधानी ठेऊ शकतो व तीच आज मनुष्याची सर्वात मोठी गरज असल्याचे परम आलय  गुरुजींनी सांगितले .  दहा दिवसांचे हे शिबीर अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन बद्ध असल्याचे त्यात प्रवेश करताना शिबिरासाठी आलेल्या साधकांनी अतिशय शिस्तीत सोडलेल्या पादतत्राणा तुन दिसत होते . १० व्या दिवशी शिबिराची सांगता करून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद या शिबिराच्या यशस्वतीतेची साक्ष देत होते .  
    पुन्हा नवी मुंबईत २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२० मध्ये शिबिरार्थींच्या खास आग्रहातून करत असल्याचे आयोजकांनी सांगितले . 
शब्दांकन : सुधीर दाणी . ( शक्य असल्यास बातमी देणे )


Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image