नेरुळ येथे मनुष्य मिलन साधना शिबिराची सांगता

नेरुळ येथे मनुष्य मिलन साधना शिबिराची सांगता.... 


"   योग्य आहार , योग्य व्यायाम व योग्य ध्यान " या सूत्राच्या माध्यमातून प्रत्येक मानवाचे शरीर व मन सुदृढ होते याची प्रचिती प्रयोगाच्या माध्यमातून -अनुभवातून देणाऱ्या 'मनुष्य मिलन साधना शिबिराचे ' आयोजन २२ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत नेरुळ येथील रामलीला मैदानात आयोजीत केले होते . या शिबिराचा लाभ जवळपास ३ हजार नागरीकांनी घेतला . सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६. ३० ते ८.३० या दोन सत्रात  परमपूज्य श्री . परम आलय जी यांनी विविध प्रयोगाच्या माध्यमातून या शिबिराचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला योग्य आहार , योग्य व्यायाम व योग्य ध्यान या गोष्टींचे महत्व प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिले . मानवाची ८० टक्के शक्ती हि डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडत असते म्हणून प्रत्येकाने आपले  मन निरोगी राहण्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे , आपल्या घराच्या स्वयंपाक घरात असणाऱ्या वस्तू मधूनच शरीरास आवश्यक व पोषक असे भोजन बनवले जाऊ शकते ,प्रत्येक मनुष्याच्या शरीरात अथांग शक्ती असते ती योग्य आहार व व्यायामातुन वृद्धिगत करता येते या सर्व सूत्रांचा अनुभव अनेकांना आल्याचा अनुभव या शिबिरात भाग घेतलेल्या नागरीकांनी सांगितले . 


   अगदी १०/१२ वर्षाच्या मुलापासून ते ७५-८० वयापर्यतच्या जेष्ठ नागरीकांनी या १० दिवशीय शिबिराचा लाभ घेतला . विशेष म्हणजे हे संपूर्ण शिबीर हे निशुल्क होते व त्याच बरोबर सर्व शिबिरार्थींना सकाळी आयुर्वदानुसार अतिशय पौष्टिक असा नाष्टा व सायंकाळी विविध प्रकारचे ७ लिक्विड्स दिले जात होते . मानवाची सूर्यनाडी व चंद्रनाडी जागृत करणारे वेगवेगळे व्यायाम शिकवले गेले . एकुणातच आपण आजूबाजूची परिस्थिती बदलू शकत नसलो तरी आपण आपला दृष्टिकॊन सकारात्मक ठेऊन आपले जीवन अधिकाधिक आनंदी व समाधानी ठेऊ शकतो व तीच आज मनुष्याची सर्वात मोठी गरज असल्याचे परम आलय  गुरुजींनी सांगितले .  दहा दिवसांचे हे शिबीर अत्यंत शिस्तबद्ध व नियोजन बद्ध असल्याचे त्यात प्रवेश करताना शिबिरासाठी आलेल्या साधकांनी अतिशय शिस्तीत सोडलेल्या पादतत्राणा तुन दिसत होते . १० व्या दिवशी शिबिराची सांगता करून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक साधकाच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद या शिबिराच्या यशस्वतीतेची साक्ष देत होते .  
    पुन्हा नवी मुंबईत २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२० मध्ये शिबिरार्थींच्या खास आग्रहातून करत असल्याचे आयोजकांनी सांगितले . 
शब्दांकन : सुधीर दाणी . ( शक्य असल्यास बातमी देणे )


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
कारवाई झालेल्या अनधिकृत बांधकामांची ८० टक्के कामे पूर्ण , सिडकोमधील भूमाफियांचे ते मुके पार्टनर कोण ? , अनधिकृत बांधकामांवर कारवाई ऐवजी लाखो रुपये घेऊन सहकार्य ?
Image
विरार इमारत दुर्घटनेनंतरही सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग कोमातच ? आजही लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देण्याची परंपरा कायम ?, विरारमध्ये इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, त्यानंतरही कारवाई ऐवजी भूमाफियांना सिडको व न.मु.म.पाचे अभय ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image