रेनकोट, गमबुट आणि गणवेश तत्काळ देण्याची सफाई कामगारांची मागणी

रेनकोट, गमबुट आणि गणवेश तत्काळ देण्याची सफाई कामगारांची मागणी 


नवी मुंबई - मुंबई, ठाणे, बदलापुर, पनवेल, नवी मुंबई  महानगर पालिकांमध्ये हजारो कायम, तथाकथित कंत्राटी सफाई कामगार रस्ते साफसफाईचे काम करतात. हे सफाई कामगार अतिशय धैर्याने व कतृत्व निष्ठेच्या भावनेने, शहर स्वच्छ ठेवण्याच्या निष्ठेने काम करत आहेत. स्वतःच आरोग्य धोक्यात घालुन जनेतेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सफाई कामगार काम करत आहेत. कोरोना महामारीच्या आघाडीवर हे सफाई कामगार योध्दा साखरे काम करत आहेत. मुख्यमंत्रानी तर हे देवच आहेत. अशी त्यांची प्रशंसा ही केली आहे. परंतु केवळ कौतुकाने पोट भरत नाही. त्या करीता या देवाची काळजी घेणे हे सरकारचे व महानगर पालिकांचे कर्तव्य आहे. महानगर पालिकांच्या अधिकाऱ्यांची या सफाई  कामगारांच्या बाबतीत तुच्छतेची व असवेदंनशीलतेची वृत्ती असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरु आहे. 
                    महानगरपालिकांमधील तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना पावसाळयाच्या सुरूवातीला गणवेश, रेनकोट व गमबुट देणे हे महानगर पालिकांवर बंधनकारक आहे. परंतु या महानगर पालिकांनी मागच्या वर्षी सुद्धा तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना गणेवश गमबुट रेनकोट दिले नव्हते. आता पावसाळा सुरू झाला आहे. आणि शहरांमध्ये कोरोनाची विशेष साथ आहे. या परिस्थितीत कामगारांना पावसात भिजत काम करावे लागल्यावर त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. या तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटाॅयझर दिले जात नाही. म्हणुन कामगारांच्या आरोग्याचा विचार करून सर्व महानगरपालिकांनी तथाकथित कंत्राटी सफाई कामगारांना गणवेश, रेनकोट, गमबुट स्वरक्षक साधने देण्यात यावी. अशी मागणी कंत्राटी सफाई कामगारांकडून होऊ लागली आहे.


Popular posts
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image