शहर स्वच्छतेमध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा गौरव


नवी मुंबई - स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम व देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक आहे.यामध्ये दररोज शहर स्वच्छ ठेवून नियमित योगदान देणा-या स्वच्छता कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. त्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा यथोचित सन्मान करणारा हा कार्यक्रम मनाला समाधान देणारा असल्याचे मत मांडत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यापुढील काळात आपण सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार व्यक्त केला.नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने आयोजित स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणा-या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांच्या सत्कार समारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.
                 यावेळी अतिवृष्टीमुळे मागील वर्षी कोल्हापूर भागात उद्भवलेल्या आपत्ती प्रसंगात चांगली कामगिरी करणा-या स्वच्छताकर्मींचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, कार्यकारी अभियंता  संजय देसाई, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आपण करीत असलेल्या चांगल्या कामाची नोंद घेऊन करण्यात येणारा सत्कार हा आपल्याला अधिक चांगले काम करण्याची उमेद देणारा असतो असे सांगत या सत्कारातून प्रेरणा घेऊन आपण शहरासाठी अधिक चांगले काम करूया असे सर्वांना आवाहन केले. कोल्हापूरमध्ये जाऊन तेथे आपले शहर समजून काम केल्याने तेथील नागरिकांसह सर्वांनीच कौतुक केलेल्या नवी मुंबईतील स्वच्छताकर्मींच्या सर्वसमावेशक मनोभूमिकेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.कोल्हापूरला गेलेल्या 80 जणांच्या मदतकार्य पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी तेथील आव्हाने, संकटे व त्यावर जिद्दीने केलेली मात याबद्दलचे अनुभव कथन केले.यावेळी 5 अधिकारी आणि 180 सफाई कर्मचारी यांचा भेटवस्तू व प्रशस्तिपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूरला गेलेल्या मदतकार्य पथकात उल्लेखनीय कामगिरी करणारे दिवंगत उप स्वच्छता निरीक्षक सत्यजित देवधर यांच्या पत्नीने त्यांच्या वतीने सन्मान स्विकारताना उपस्थितांनी उठून उभे रहात देवधरांच्या समर्पित कार्याला आदरांजली अर्पण केली.अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत होत असलेला आमचा मानसन्मान मनाला आनंद देणारा असून यापुढील काळात अधिक चांगले काम करून नवी मुंबईला देशात आघाडीवर नेऊ असा निश्चय केला असल्याचे मत अनेक सफाई कर्मचा-यांनी व्यक्त केले. 


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image