नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन हलगर्जीपणाचा आणखी एक बळी 

नवी मुंबई - महानगरपालिकेच्या गळ्यातील ताईत समजल्या जाणाऱ्या वादग्रस्त उद्यान विभागाच्या कंत्राटदाराचा अजून एक गैरकारभार चव्हाट्यावर आला असून याचा फटका एका कंत्राटी कामगाराला बसला आहे.ईएसआयसी ची रक्कम पगारातून कपात होत असतांनाही ईएसआयसी कार्ड देण्यात न आल्याने उपचाराअभावी प्रवीण कदम (३२) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.यावर संतापलेल्या कामगारांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली असता अजून किती कामगारांचा बळी प्रशासन घेणार,अजून किती कंत्राटदाराला पाठीशी घालणार असा प्रश्न उपस्थित केला.गेल्या १२ वर्षांपासून प्रशासन अधिकारी आणि कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचेच काम केले असून किती दिवस हे चालणार असा प्रश्नही समता समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी उपस्थित केला.
                   सोमवारी नेरुळ सेक्टर १९ मधील उद्यानात काम करणाऱ्या प्रवीण बबन कदम (३२) या कंत्राटी कामगाराचा ईएसआयसी कार्ड नसल्यामुळे उपचाराअभावी मृत्यू झाला.जर त्याच्याकडे ईएसआयसी कार्ड असते तर त्याला वेळेवर उपचार घेता आले असते आणि त्याचा जीव वाचला असता असे यावेळी भोईर यांनी सांगितले.त्याच उद्यानात काम करणाऱ्या अजून एका कामगाराची उपचाराअभावी प्रकृती गंभीर आहे.त्यालाही जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर भविष्यात दगाफटका होऊ शकतो.अशी शक्यता यावेळी कामगारांनी वर्तवली.गेल्या १२ वर्षांपासून शेकडो कामगार उद्यान विभागात कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत.वेळोवेळो कंत्राटदार बदलला तरी कामगार मात्र तोच राहत आहे.प्रत्येक कामगारचे पी एफ व ईएसआयसी रक्कम पगारातून कपात केली जाते.मात्र त्याच्या सुविधा त्यांना आजही दिल्या जात नाहीयेत.लाखो करोडो रुपयांच्या फाईली बिलापोटी पालिका अधिकाऱ्यांच्या टेबलावर येतात आणि त्या डोळेझाकुन पास होतात.जर त्याच वेळी लक्ष घातले तर अनेक गैरकारभार समोर येऊ शकतात.मात्र तसे होत नसल्याने कामगार देशोधडीला लागत असल्याचे भोईर यांनी बोलतांना सांगितले.गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्यान विभागाचे एन के शहा या कंत्राट दाराला कंत्राट देण्यात आले.तो कंत्राटदार सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने याचा फटका कामगारांना बसला आहे.त्यानेही कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सुरु ठेवले असल्याचे यावेळी कामगारांनी सांगितले.उद्यान विभागात ६०० हुन अधिक कामगार काम करत आहेत.त्यांना कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रशासन अनेक सुविधाही देण्यात येतात.मात्र त्या कामगारांपर्यंत पोहोचतच नसल्याचे उघडकीस आले आहे.कामगारांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका स्वछ भारत पुरस्कार,संत गाडगेबाबा अभियान यासह अनेक पुरस्कार प्राप्त करत आली आहे.त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरज असल्याचे गजानन भोईर यांनी सांगितले.
कोट - एन के शहा हा कंत्राटदार कंत्राटी कामगारांच्या ईएसआयसी रकमेपोटी घेतलेली रक्कम जमा करतो की नाही,त्याचे कार्ड कामगारांना का देण्यात आले नाही याची माहिती मागवली आहे.
मनोज महाले - उपायुक्त ,नवी मुंबई महानगरपालिका 


 


Popular posts
सिडको व मनपाच्या अतिक्रमण विभागाने भ्रष्टाचाराचा कळसच गाठला ?, भूमाफियांकडून लाखो रुपयांत सिडको व मनपा मॅनेज होत असल्याने सर्व नियम धाब्यावर ?
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image