नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन हलगर्जीपणाचा आणखी एक बळी 

नवी मुंबई - महानगरपालिकेच्या गळ्यातील ताईत समजल्या जाणाऱ्या वादग्रस्त उद्यान विभागाच्या कंत्राटदाराचा अजून एक गैरकारभार चव्हाट्यावर आला असून याचा फटका एका कंत्राटी कामगाराला बसला आहे.ईएसआयसी ची रक्कम पगारातून कपात होत असतांनाही ईएसआयसी कार्ड देण्यात न आल्याने उपचाराअभावी प्रवीण कदम (३२) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.यावर संतापलेल्या कामगारांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली असता अजून किती कामगारांचा बळी प्रशासन घेणार,अजून किती कंत्राटदाराला पाठीशी घालणार असा प्रश्न उपस्थित केला.गेल्या १२ वर्षांपासून प्रशासन अधिकारी आणि कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचेच काम केले असून किती दिवस हे चालणार असा प्रश्नही समता समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर यांनी उपस्थित केला.
                   सोमवारी नेरुळ सेक्टर १९ मधील उद्यानात काम करणाऱ्या प्रवीण बबन कदम (३२) या कंत्राटी कामगाराचा ईएसआयसी कार्ड नसल्यामुळे उपचाराअभावी मृत्यू झाला.जर त्याच्याकडे ईएसआयसी कार्ड असते तर त्याला वेळेवर उपचार घेता आले असते आणि त्याचा जीव वाचला असता असे यावेळी भोईर यांनी सांगितले.त्याच उद्यानात काम करणाऱ्या अजून एका कामगाराची उपचाराअभावी प्रकृती गंभीर आहे.त्यालाही जर वेळेवर उपचार मिळाले नाही तर भविष्यात दगाफटका होऊ शकतो.अशी शक्यता यावेळी कामगारांनी वर्तवली.गेल्या १२ वर्षांपासून शेकडो कामगार उद्यान विभागात कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत.वेळोवेळो कंत्राटदार बदलला तरी कामगार मात्र तोच राहत आहे.प्रत्येक कामगारचे पी एफ व ईएसआयसी रक्कम पगारातून कपात केली जाते.मात्र त्याच्या सुविधा त्यांना आजही दिल्या जात नाहीयेत.लाखो करोडो रुपयांच्या फाईली बिलापोटी पालिका अधिकाऱ्यांच्या टेबलावर येतात आणि त्या डोळेझाकुन पास होतात.जर त्याच वेळी लक्ष घातले तर अनेक गैरकारभार समोर येऊ शकतात.मात्र तसे होत नसल्याने कामगार देशोधडीला लागत असल्याचे भोईर यांनी बोलतांना सांगितले.गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्यान विभागाचे एन के शहा या कंत्राट दाराला कंत्राट देण्यात आले.तो कंत्राटदार सुरवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने याचा फटका कामगारांना बसला आहे.त्यानेही कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम सुरु ठेवले असल्याचे यावेळी कामगारांनी सांगितले.उद्यान विभागात ६०० हुन अधिक कामगार काम करत आहेत.त्यांना कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रशासन अनेक सुविधाही देण्यात येतात.मात्र त्या कामगारांपर्यंत पोहोचतच नसल्याचे उघडकीस आले आहे.कामगारांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका स्वछ भारत पुरस्कार,संत गाडगेबाबा अभियान यासह अनेक पुरस्कार प्राप्त करत आली आहे.त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरज असल्याचे गजानन भोईर यांनी सांगितले.
कोट - एन के शहा हा कंत्राटदार कंत्राटी कामगारांच्या ईएसआयसी रकमेपोटी घेतलेली रक्कम जमा करतो की नाही,त्याचे कार्ड कामगारांना का देण्यात आले नाही याची माहिती मागवली आहे.
मनोज महाले - उपायुक्त ,नवी मुंबई महानगरपालिका 


 


Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image