कर्जदारांना वैतागून दारावे गावातील तरुणाची आत्महत्या

 


नवी मुंबई - कर्जदार वारंवार कर्ज मागत असल्याने तणावात असलेल्या तरुणाने सीवूड दारावे गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता त्यातही त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे एपीआय स्वप्नील इज्जेपवार यांनी दिली.सदर प्रकरणाची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

                     कोरोना काळात बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांवर आर्थिक संकट ओढावले.त्यातच मोठ्या प्रमाणात नागरिकांवर विविध प्रकारचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.यातच कर्जदार आणि बँकांनी कर्ज वसूल करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केल्याने आजमितीस जगायचे कसे असा प्रश्न कर्जदारांसमोर उभारला आहे.याचाच प्रत्यय शनिवारी दारावे गावात दिसून आला.दारावे गावात राहणाऱ्या अभिषेक यशवंत माहे (२६) या तरुणाने कर्जदार वारंवार कर्ज मागण्यासाठी तगादा लावत असल्याने मानसिक तणावात येऊन शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास दारावे गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली असता त्यामधून सदर प्रकार उघडकीस आला.अभिशेष हा आपल्या परिवारासह दारावे गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहत होता.त्याच्या आत्महत्येची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास करण्यात येईल असे यावेळी नेरुळ पोलीस ठाण्याचे एपीआय स्वप्नील इज्जेपवार यांनी सांगितले. 


Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image