तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या की आत्म्हत्या ?




नवी मुंबई - सीबीडी - बेलापूर मधील राजश्री लॉटरीच्या दुकानात काम करणाऱ्या सत्यवान पानीरे (२७) या चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा अद्याप शोध लागला नसून तो जिवंत आहे कि त्याचा मृत्यू झालाय,त्याची हत्या झालीय अथवा त्याने आत्महत्या केलीय याचा काहीच तपास लागत नसून त्याचा तत्काळ शोध घ्या असे साकडे सत्यवान पानीरे (२७) यांचे मोठे बंधू श्रीकांत पानीरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना घातले आहे.या प्रकरणी त्यांनी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी जी शेखर भेट घेतली असता बेपत्ता असलेल्या सत्यवानचा शोध लवकरात लवकर घेण्याची विनंती केली.

                   सत्यवान पानीरे (२७) त्याचे चुलत मामा संभाजी पाटील यांच्याकडे काही वर्षांपूर्वी कामाला आला होता.अनेक वर्ष काम करत असतांनाच त्याने मामाचा विश्वास संपादन केला असता संभाजी पाटील यांनी सत्यवानवर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या.गेल्या १० ते १६ वर्षाचा पगारही संभाजी पाटील यांच्याकडेच जमा असून पाटील सत्यवानला फक्त गरजेसाठी पैसे देत असत.घर घेऊन देतो,लग्न लावून देतो असे अनेक आमिषे दाखवून पाटील यांनी सत्यवानला कामाला ठेवले होते.फेब्रुवारी २०१७ मध्ये तो अचानक बेपत्ता झाल्याने संभाजी पाटील यांनीच तो बेपत्ता झाल्याची तक्रार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल केली.त्या नंतर आजतायागत फक्त सत्यवानाचा शोधच सुरु आहे.त्याच्या परीरावालाही याबाबत अंधारात ठेवले असता अखेर भावाच्या शोधासाठी सत्यवानचे मोठे बंधू श्रीकांत (सुखदेव) बाळासो पानीरे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यावेळी त्यांनाही तपास सुरु आहे असेच सांगण्यात आले.त्यावर संभाजी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जर तुला माझ्यावर संशय असेल तर सत्यवानची बॉडी शोधून दाखव असे आव्हानच केले असता पानीरे यांच्या पायाखालची जमीनच सरकली.यावर अधिक चौकशी केली असता ज्यादिवशी सत्यवान बेपत्ता झाला त्या एक दिवस अगोदर त्याला संभाजी पाटील यांच्याकडून मारहाण करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली.त्याचबरोबर संभाजी पाटील यांच्या मोठ्या मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध असल्याची शक्यताही श्रीकांत (सुखदेव) बाळासो पानीरे यांनी व्यक्त केली आहे.संभाजी पाटील हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे त्यानेच भावाचे काहीतरी बरेवाईट केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याची या प्रकरणात कठोर चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्रीकांत (सुखदेव) बाळासो पानीरे यांनी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी जी शेखर यांच्याकडे केली आहे.





 

Popular posts
विकासाच्या 'इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरणार पायाभूत सोयीसुविधांच्या विकासामुळे तिसरी व चौथी मुंबई, बुलेट ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास शक्य
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image