विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण


नवी मुंबई - अनधिकृत व अतिक्रमण प्रकरणात सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या अधिकाऱ्याला याच प्रकरणात अभय दिल्यास येत्या ८ मार्च पासून महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राजे प्रतिष्टान नवी मुंबई सचिव योगेश महाजन यांनी दिला आहे.महाजन यांनी बुधवारी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांची या प्रकरणी भेट घेत या प्रकरणी तत्काळ पावले उचलण्याची विनंती केली.त्या नंतर एकतर्फी न्यायाचे विरोधात आम्ही ८ मार्च या महिला दिनापासून समस्त अतिक्रमण पीडित धारक ,फेरीवाले त्यात महिलांच्या सहभागासह आमरण उपोषणास सीबीडी येथील मनपा मुख्य कार्यालयासमोर बसू असा इशारा दिला आहे.

                अतिक्रमण विभागाच्या सतत कारवाया सुरु असून याचा फटका सामान्य नागरिकांना पडत आहे.कधी कोरोना तर कधी स्वच्छ भारत अभियानच्या नावाखाली कारवाया कठोर केल्या जात असल्याने जगायचे तरी कस असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभारला आहे.अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण हे बेकायदेशीरच असल्याने बहुतांश होणाऱ्या कारवाईला सामोरे जातात.हे सर्व माहित असतांनाही कायद्याचे रक्षकच जर स्वतःच अतिक्रमण करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करायची कोणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.याचाच भाग म्हणून राजे प्रतिष्ठानने या प्रकरणात पुढाकार घेत अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विभागीय अग्निशनम अधिकारी पुरोषोत्तम विनायकराव जाधव यांच्यावर तत्काळ कारवाई करावी या आशयाचे निवेदन एक महिन्यापूर्वी आयुक्तांना दिले आहे.त्या नंतर मात्र काहीच हालचाली न झाल्याने अतिक्रमण कारवाया थांबवण्याचे निवेदन देण्यात आले.त्यावरही दखल न घेण्यात आल्याने समस्त अतिक्रमण पीडित धारक ,फेरीवाले त्यात महिलांच्या सहभागासह आमरण उपोषणास सीबीडी येथील मनपा मुख्य कार्यालयासमोर बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या उपोषणाला सुरवात करण्यात येईल असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले आहे.नियमांची कोणतीही माहिती नसलेले गरीब फेरीवाले ,झोपडीधारक, चाळधारक, किंवा गरिबीमुळे परवडणारी घरे न घेता अनधिकृत इमारतीतील रहिवाशी यांचेवर आपले अतिक्रमण विभागामार्फत वारंवार कारवाई होते.नियमांचे कमी माहिती असलेले लोकप्रतिनिधी आपले प्रशासन अनधिकृत बांधकामाचे कारण देत नगरसेवक सारखे पदावरून काढून टाकतात.म्हणजे सामान्य जनता ते लोकप्रतिनिधी यांचेवर तत्काळ कारवाई करणारे नमुमपा प्रशासन एका वरिष्ठ अधिकाऱ्यास अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करणे हे सिद्ध होऊनसुद्धा काहीच कारवाईचे पाऊल उचलत नाही हि दुःखाची बाब असल्याची खंत यावेळी महाजन यांनी व्यक्त केली.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image