अतिक्रमण अधिकाऱ्याला अभय असेल तर इतर कारवायांनाही अभय द्या - राजे प्रतिष्ठान


नवी मुंबई - विभागीय अग्निशनम अधिकारी पुरोषोत्तम विनायकराव जाधव यांनी घराचा ताबा मिळण्या अगोदरच घराचा ताबा घेऊन त्यात अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला असून त्यांच्यावर नियमाने कारवाई व्हायला हवी यासाठी राजे प्रतिष्ठान नवी मुबई सचिव योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदन दिले आहे.या निवेदनाची मनपा आयुक्तांकडून दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येत असल्याने मंगळवारी पुन्हा आयुक्तांची भेट घेऊन अखेर अधिकाऱ्यांना अभय का असा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.इतर कारवाया तेजीत सुरु असतांना अधिकाऱ्याला मात्र अभय देण्यात येत आहे,त्यामुळे अभय द्यायचेच असेल तर सर्वाना द्या अशी विनंती यावेळी आयुक्तांना करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

             नवी मुंबई महानगरपालिकेकडून स्वछ भारत अभियान उत्तम रित्या राबवण्यात येत असून मनपाचा अतिक्रमण विभागही आक्रमक झाला आहे.पदपथावर तसेच अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडगा उभारला जात आहे.त्याचवेळी अधिकारी असूनही स्वतःह अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याला अभय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.एकीकडे कारवाई तर दुसरीकडे अभय असा दुजाभाव जर मनपा करणार असेल तर याविरोधात राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कठोर भूमिका घेण्यात येईल असा इशारा योगेश महाजन यांनी दिला आहे.त्याचबरोबर ज्या व्यावसायिकांवर आकसापोटी कारवाई करण्यात येत आहे अश्या व्यावसायिकानी राजे प्रतिष्ठानशी संपर्क करावा असे आव्हानंही करण्यात आले आहे.जे येतील त्यांना सोबत घेऊन आयुक्तांची भेट घेण्यात येईल असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले आहे.नवी मुंबईचे विभागीय अग्निशनम अधिकारी पुरोषोत्तम विनायकराव जाधव हे एक उच्च अधिकारी आहेत.त्यांना मनपाच्या कोठ्यातून वाशी अग्निशमन केंद्र या ठिकाणी असलेल्या रहिवाशी इमारतीत १८ /१० /२०२० रोजी नियमांच्या आधिन राहून सदनिका देण्यात आली.तसे पत्र त्यांना सादर करण्यात आल्या नंतर त्या अगोदरच त्यांनी तीन महिने अगोदरच या सदनिकेचा ताबा घेऊन त्यात अतिक्रमण केले असल्याची बाब समोर आली आहे.हे मनपाच्या पाहणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.जाधव यांनी सदनिकेमधील किचन लगत असलेली मोकळी जागा व डक्टची जागा बंधिस्त केली असून ती जागा किचन मध्ये समाविष्ट केली आहेसदर बाब ही भोगवटा प्रमाणपत्र मंजूर नकाशाचे उल्लंघन करणारी असल्याचे मनपा अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.त्याचबरोबर त्याच सदनिकेमध्ये अंतर्गत लाकडी फर्निचरचे काम सुरु असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे होते मात्र तसे न करता त्यांना अतिक्रमण विभागाकडून अभय दिल्याने मनपा अतिक्रमाणात दुजाभाव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.जर एखाद्या लोकप्रतिनिधीने अनधिकृत बांधकाम केले तर त्यांचे पद रद्द करण्यात येत,त्याचबरोबर शहरात होत असलेल्या बहुतांश इमारतींवर मनपाचा अतिक्रमण विभाग आक्रमक होतांना दिसून येतो.मात्र या बाबतीत नमतेपणा का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकरणी तत्काळ पावले उचलून त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image