मिस नवी मुंबई सौदंर्यवती स्पर्धेची दहा वर्षाची शृंखला, कोण जिंकणार मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाचा मुकूट

नवी मुंबई - शहराची सांस्कृतिक वारसा जपणारी व ठसा उमटवणारी मिस नवी मुंबई ही सौदंर्य स्पर्धा दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या सौदंर्य स्पर्धेने या कालावधीत कित्येक सौदंर्यवतीना राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे. यु अँड आय एन्टरटेन्टमेंट या संस्थेने दर्जात्मक व सातत्याने ही स्पर्धा आयोजित करीत एका उंचीवर आणून ठेवली आहे. असे म्हणतात जर तुम्ही जिंकण्यासाठी समोर येत नसाल तर तुम्ही कधीच जिंकणार नाहीत व सामान्य म्हणून जगाल. जे जिंकण्यासाठी तत्पर आहेत त्यांच्या जिद्दीला , पुढाकाराला पंख देण्यासाठी मिस नवी मुंबई ही सौदंर्य स्पर्धा पाठबळ देते.

               या माध्यमातून कित्येक सौन्दर्यवतींना आत्मविश्वास तर मिळालाच तसेच त्यांनी स्वतःचे नाव कमविले आहे. मिस इंडिया ची विजेती सुमन राव, रियॅलिटी शो मध्ये गाजलेल्या दिव्या अग्रवाल, अक्षता सोनावणे आणि कविता मिश्रा यांनी सुद्धा आपली सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे."या स्पर्धेतून पुढे गेल्यानंतर आंतराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व ज्या सौदंर्यवती करणार आहेत. अश्या अंतिम फेरीसाठी सोळा गुणवान सौदंर्यवती निवडणेतही शेकडो मुलीं मधून हे काम अत्यंत कठीण होते. या करीता आमची तज्ञ टीम रात्रंदिवस मेहनत घेत त्यांना अंतिम फेरी करीता सज्ज करतात. या मध्ये आम्ही कोणतीच कसुर ठेवत नाही अशी माहीती यु अँड आय एन्टरटेन्टमेंटचे सर्वेसर्वा व स्पर्धेचे आयोजक हरमीत सिंग यांनी पत्रकार परिषेदत दिली. वाशीच्या फोर पॉईंट या पंचतारांकित हॉटेल मध्ये अंतिम फेरीत पोहचलेल्या सोळा सौदंर्यवतीना घोषित केले.त्या पुढील प्रमाणे आहेत ऐश्र्वर्या नायडू ,आंषिका अग्रवाल,अपर्णा पाठक ,गौरी गोठणकर, हर्षदा माळी, हर्षिता पुजारी, जान्हवी कदम, पायल रोहेरा, पूजा पुजारी, प्रिया चव्हाण, संयुंक्ता पावस्कर,श्रुती अहिर, सिस्मिता पुजारी, सृष्टी बन्नाट्टी, उर्जिता मोरे, योगिता राठोड.पत्रकार परिषदेत फोर पॉईंट चे संचालक राहुल बनसोडे यांनी सांगितली कि "मिस नवी मुंबई व यु अँड आय यांच्याशी आम्ही बरेच वर्षापासून काम करीत आहोत. शहराची ओळख बनलेली ही स्पर्धा आपल्या शहराचे नाव सातासमुद्रापार गाजवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे"यावेळी डॉक्टर संजीव कुमार ,उद्योजक अशोक मेहरा, डॉक्टर वंदना जैन उपस्थित होत्या. मिस नवी मुंबईच्या दहाव्या पर्वाची अंतिम स्पर्धा ही शनिवार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी वाशीच्या फोर पॉईंट हॉटेल येथे संपन्न होणार आहे. अंतिम स्पर्धेत ज्या सोळा सौंदर्यवती जिंकण्यासाठी सज्ज आहेत त्यांना रॅम्पवॉक चे प्रशिक्षण स्मृती भतिजा देणार आहे. यापूर्वी तिने मिस इंडिया २०१९ च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास ही गोष्ट या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची असते त्यामुळे मानसोपचार तज्ञ इंद्रप्रीत कौर गुप्ता स्पर्धकांना आपला आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी प्रशिक्षण देतील.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image