एलआयसी एजंटचा कर्जाला कंटाळून खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : मी मेलो तर माझ्या मुलाची कर्जातून मुक्तता होईल,त्यांना पॉलीसीचे पैसे मिळतील या विचारातून कर्जाला कंटाळलेल्या इसमाने शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अधिकाऱ्यांनी वेळीच मदत केल्याने त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचे प्राण वाचवले. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

                  शेषनाथ दिवेदी (५६) असे त्या इसमाचे नाव असून तो नेरुळ विभागात राहणार आहे.एलआयसी एजंटचे काम करणारा दिवेदी गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाला कंटाळला होता.तो एलआयसीचे काम करत असल्याने त्याला पॉलिसीची जाणीव होती.या विचाराने त्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.सकाळी तो १०.३० च्या सुमारास वाशी खाडी पुलावर गेला असता त्याने त्या ठिकाणाहून उडी मारहती आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी वाहतूक पोलिस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पाहिले.त्याचवेळी तातडीने हालचाली करत त्यांनी धाव घेतली.आणि कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.दरम्यान, नवी मुंबईतील महापालिका रुग्णालयात संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीचे प्राण वाचवणारे वाहतूक पोलीस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केलं.

Popular posts
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image