अग्निशनम विभाग अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन

नवी मुंबई -  एक पत्नी व मुलं असतांनाही दुसरे लग्न करून नवीन संसार थाटणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका अग्निशन विभागातील अधिकारी एकनाथ रूपा पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले आहे.सदरील बाब ही गंभीर असल्याने अश्या अधिकाऱ्यावर तत्काळ बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.

                      वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा केली असून दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, ना निवडणुकीचं तिकीट या प्रकारची सक्ती करण्याकडे भर दिला आहे.योगी सरकारने या कडे आता लक्ष वेधले असतांनाच महाराष्ट्रात मात्र हा कायदा पूर्वीपासून लागू आहे.मात्र त्याकडे फारसे कुणाचे लक्ष नसल्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना बळ मिळाले आहे.योगी सरकारच्या कायद्याची चर्चा होत असतांनाच राज्यात नवी मुंबई अग्निशमन दलातील एका कर्मचाऱ्याने या कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले आहे.एकनाथ रूपा पवार हे अग्निशन सेवेत सहा.केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या श्रीम.लीलाबाई एकनाथ पवार व सविता एकनाथ पवार अश्या दोन पत्नी आहेत.प्रथम पत्नीपासून त्यांना एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना प्रियांका ,गौरी व वरून अशी तीन मुलं आहेत.अश्या प्रकारे एकनाथ पवार यांना दोन पत्नी व चार मुलं आहेत.आजमितीस पवार हे अग्निशन विभागाच्या निवासी इमारतीत राहत असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासकीय अथवा प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ अंतर्गत परिवाराची माहिती देणे बंधनकारक आहे.या माहितीचे उल्लंघन करणारा अधिकारी अथवा कर्मचारी कार्यरत असेल तर त्याच्यावर बडतर्फ करण्याची तरतूद आहे.यानुसार पवार यांच्याकडून वरील कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरील प्रतिबंध कायदा हा फोजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरत असल्याने प्रशासनाने तत्काळ गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे,मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करता नियमबाह्य काम करणाऱ्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे असे सांगण्यात येत आहे.यामुळे सदर प्रकरणाची दखल घेऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक समाजसेवकाने लेखी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

कोट - काही कारणास्तव मी दोन लग्न केले आहेत.मात्र असा प्रकार करणारा मी एकटाच नाही तर अजून याच विभागात खूप जण आहेत.त्याचीही माहिती मी येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला देतो.त्याचवेळी याची माहिती मी प्रशासनाला ही देणार आहे.त्याचबरोबर असा प्रकार करणारा मी एकटाच नसून याच विभागातील ढोमणे, बाबर, चन्ने, सुर्वे यासह काही अधिकारीही आहेत.त्यांचीही चौकशी केली तर तीही माहिती पुढे येईल.

एकनाथ रूपा पवार -  सहा.केंद्र अधिकारी, अग्निशन विभाग 


ग 

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image