अग्निशनम विभाग अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन

नवी मुंबई -  एक पत्नी व मुलं असतांनाही दुसरे लग्न करून नवीन संसार थाटणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका अग्निशन विभागातील अधिकारी एकनाथ रूपा पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले आहे.सदरील बाब ही गंभीर असल्याने अश्या अधिकाऱ्यावर तत्काळ बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.

                      वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशमध्ये ‘टू चाईल्ड पॉलिसी’ची घोषणा केली असून दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, ना निवडणुकीचं तिकीट या प्रकारची सक्ती करण्याकडे भर दिला आहे.योगी सरकारने या कडे आता लक्ष वेधले असतांनाच महाराष्ट्रात मात्र हा कायदा पूर्वीपासून लागू आहे.मात्र त्याकडे फारसे कुणाचे लक्ष नसल्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना बळ मिळाले आहे.योगी सरकारच्या कायद्याची चर्चा होत असतांनाच राज्यात नवी मुंबई अग्निशमन दलातील एका कर्मचाऱ्याने या कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले आहे.एकनाथ रूपा पवार हे अग्निशन सेवेत सहा.केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या श्रीम.लीलाबाई एकनाथ पवार व सविता एकनाथ पवार अश्या दोन पत्नी आहेत.प्रथम पत्नीपासून त्यांना एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना प्रियांका ,गौरी व वरून अशी तीन मुलं आहेत.अश्या प्रकारे एकनाथ पवार यांना दोन पत्नी व चार मुलं आहेत.आजमितीस पवार हे अग्निशन विभागाच्या निवासी इमारतीत राहत असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासकीय अथवा प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ अंतर्गत परिवाराची माहिती देणे बंधनकारक आहे.या माहितीचे उल्लंघन करणारा अधिकारी अथवा कर्मचारी कार्यरत असेल तर त्याच्यावर बडतर्फ करण्याची तरतूद आहे.यानुसार पवार यांच्याकडून वरील कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरील प्रतिबंध कायदा हा फोजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरत असल्याने प्रशासनाने तत्काळ गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे,मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करता नियमबाह्य काम करणाऱ्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे असे सांगण्यात येत आहे.यामुळे सदर प्रकरणाची दखल घेऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक समाजसेवकाने लेखी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

कोट - काही कारणास्तव मी दोन लग्न केले आहेत.मात्र असा प्रकार करणारा मी एकटाच नाही तर अजून याच विभागात खूप जण आहेत.त्याचीही माहिती मी येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला देतो.त्याचवेळी याची माहिती मी प्रशासनाला ही देणार आहे.त्याचबरोबर असा प्रकार करणारा मी एकटाच नसून याच विभागातील ढोमणे, बाबर, चन्ने, सुर्वे यासह काही अधिकारीही आहेत.त्यांचीही चौकशी केली तर तीही माहिती पुढे येईल.

एकनाथ रूपा पवार -  सहा.केंद्र अधिकारी, अग्निशन विभाग 


ग 

Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image