जनरल बिपीन रावत व त्यांच्यासह १२ अधिकारी व जवान यांना सैनिक फेडरेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण

नवी मुंबई :- तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याच अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासहीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.देशाच्या या शूर वीरांना सैनिक फेडरेशनच्या वतीने नवी मुंबई,नेरुळ मध्ये शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.जनरल विपिन रावत हे सर्जिकल स्ट्राईक व ऑपरेशन ऑल ऑउटचे मुख्य सूत्रधार होते अश्या अनेक युद्धात त्यांनी भाग घेतले ,ते पूर्णपणे देशाला समरप्रीत अधिकारी होते,असा वीर योद्धा दुर्घटने मध्ये शहीद होतो जे आपले खरे हिरो आहे असे यावेळी बोलतांना सैनिक फेडरेशनचे नवी मुंबई अध्यक्ष सुरेश काकडे यांनी सांगितले.

                       बिपीन रावत बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाहून सुलूर इथं दाखल झाले होते. त्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते तामिळनाडूच्या वेलिंग्टनकडे निघाले होते. वेलिंग्टन इथल्या स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार होते. यादरम्यान बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यादेखील त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये होत्या.मात्र, ११.४८ वाजता सुलूरहून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त समोर आलं. या दुर्घटनेत रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या बिपीन रावत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.त्यानंतर एकच खळबळ माजली.सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतांनाच नवी मुंबई नेरुळ मध्येही सैनिक फेडरेशनच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सैनिक फेडरेशन नवी मुंबई अध्यक्ष सुरेश काकडे व इतर पदअधिकारी यांच्या वतीने CDS जनरल विपिन रावत व त्यांच्यासह १२ अधिकारी व जवान यांच्या श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी काकडे यांनी बोलतांना सांगितले की जनरल बिपीन रावत हे सर्जिकल स्ट्राईक व ऑपरेशन ऑल ऑउटचे मुख्य सूत्रधार होते. अश्या अनेक युद्धात त्यांनी भाग घेतले , ते पूर्णपणे देशाला समरप्रीत अधिकारी होते, अश्या वीर योद्धा दुर्घटने मध्ये शहीद होतो जे आपले खरे हिरो आहे.पण दुर्दैव आहे की कोणत्याही राजकीय पक्षाने, सिने अभिनेत्याने किवा भारतीय खेळाडूने श्रद्धांजली अर्पित केली नाही हि खरोखर खूप निंदनीय बाब आहे.

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image