वेटिंग वरील सुरक्षा रक्षक सोडून बोर्डाची मनपा बरोबर सेंटिंग ?


नवी मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून काम मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागात काम देण्याऐवजी त्यांना वेटिंगवरच ठेवण्यात आलेल्या बोर्ड अधिकाऱ्यांची मनपा अधिकाऱ्यांबरोबर सेटिंग तर झाली नाही ना ? असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे.मनपाच्या उद्यान विभागात सुरक्षा रक्षकांसाठी शेकडो जागा असून त्या ठिकाणी खासगी एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.सदरील बाब बोर्डाच्या अधिकाऱ्यांना माहित असतांनाही याकडे का ते दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
                 सुरक्षा रक्षक म्हणून तरुणांना नोकरी मिळावी.या कामाचा त्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून सरकारने सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली. सरकारी, निमसरकारी कार्यालये, विविध महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांनी सरकारच्या मंडळाकडूनच रक्षक घ्यावेत, असे आदेशही देण्यात आले, मात्र काही अपवाद वगळता बहुतांश सरकारी कार्यालयांनी खासगी एजन्सीकडून सुरक्षा रक्षक घेतले असल्याचे निदर्शनास आले आहेत.त्यामुळे मंडळाकडे नोंदणी केलेले तरूण आजही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.सानपाडा येथील सुरक्षा रक्षक मंडळात तब्बल दोन हजारांच्या जवळपास सुरक्षा रक्षक कामाच्या प्रतीक्षेत आहेत.आज ना उद्या काम मिळेल या अपेक्षेपोटी शेकडो तरुण बोर्डाच्या कार्यालजवळ हजेरी लावत असतात.त्यांना काम देणे हि बोर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याने त्याकडे ते स्वहितासाठी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या चार महिन्यांपासून मनपाच्या उद्यान विभागात नमो फैसिलीटी सर्व्हिसेस कंपनीचे १०० हुन अधिक गार्ड काम करत आहेत.त्यांना मंडळाच्या नियमानुसार वेतन देणे गरजेचे असतांनाही त्यांना तुटपुंजे वेतन देण्यात येत आहेत.सदरील बाब मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहित असूनही ते मूग गिळून गप्प आहेत.जर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मनपाला धारेवर धरले असते तर आजमितीस मंडळाच्या वेटिंगवरील अनेकांना काम मिळाले असते.तसे होत नसल्याने मनपा, नमो फैसिलीटी सर्व्हिसेस कंपनी व मंडळ अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील खासगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमन १९८१ कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र खासगी सुरक्षा सल्लागार मंडळाची स्थापन करण्यात आली. समितीच्या २००६च्या निर्णयानुसार सरकारी, निमसरकारी कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आदी ठिकाणी मंडळाकडूनच सुरक्षा रक्षक घ्यावेत, असे बंधनकारक करण्यात आले.शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर शिक्षेची, दंडाची तरतूद करण्याची तरतूद कायद्यात आहे, मात्र त्याची अमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही.


कोट - या विषयी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
अध्यक्ष - राजेश आडे (सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ)


 


Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image