तंबाखूच्या रागातून स्वाभिमान दुखावल्याने एकाची हत्या ,आरोपीला अटक

तंबाखूच्या रागातून स्वाभिमान दुखावल्याने एकाची हत्या ,आरोपीला अटक

नवी मुंबई  - तंबाखू मागितल्याचा राग मनात धरून एका इसमाची हत्या करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे.या आरोपीवर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने हत्येची पोलिसांना कबुली दिली आहे.तंबाखूच्या वादातून दोघांचाही स्वाभिमान दुखावला गेल्याने सदरील हत्याकांड झाले असल्याचे सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले.
                    ओमप्रकाश शर्मा असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो भंगार वेचण्याचे काम करतो.हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला नेरुळ परिसरातून शिताफीने अटक केली.तर ननकु श्यामलाल राजभर उर्फ भारद्वाज असे मयत इसमाचे नाव असून तो नेरुळ सेक्टर २ येथे राहत होता.वाहन चालवण्याचे काम करणारा भारद्वाज भावाला भेटण्यासाठी जात असतांना सदरील प्रकार घडला. १९ नोव्हेंबर रोजी भारद्वाज सायंकाळी ४ च्या सुमारास पाम बीज मार्गावरून वाशीला चालत भावाला भेंटण्यासाठी जात असतांना तो काही वेळ पाम बीज मार्गावर थांबला होता.त्याच वेळी त्या ठिकाणी ओमप्रकाश आलाअसता त्याला भारद्वाजने तंबाखू मागितली.त्यावर मी दुकानदार आहे का असा प्रश्न ओमप्रकाश ने उपस्थित केला.याचा राग भारद्वाजला आला असता त्याने ओमप्रकाश ला मारहाण केली आणि वाशीच्या दिशेने चालत पळ काढला.त्याचवेळी ओमप्रकाशलाही राग अनावर झाला असता त्यानेही भारद्वाजचा पाठलाग केला आणि सानपाडा मोराज जवळील पाम बीज मार्गावर लोखंडी सळईने भारद्वाजवर हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला असता त्याने तिथून पळ काढला.याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्याला अगोदर उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी त्याची हत्या झाल्याचे समोर आले.या प्रकरणी पोलिसांनी तातडीने घटनेची माहिती मिळवली आणि हत्या करणाऱ्या ओमप्रकाशलाही ताब्यात घेतले.त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Popular posts
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image